Wednesday, 12 November 2025

संगमनेरात २ लाख रुपये किंमतीचे गोमंश पकडले! ८ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

 



संजय साबळे/संगमनेर प्रतिनिधी

: नगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आणि संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यात   दोन लाख रुपये किंमतीचे १००० किलो गोमांस आणि गोमांस वाहतूक करणारा छोटा हत्ती आणि झायलो कार असा आठ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाई दरम्यान एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला असून  एकाला पोलिसांनी अटक केली

          काल मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जोर्वे नाका परिसरात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या व संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. यावेळी या पथकाला छोटा हत्ती (क्रमांक एम.एच ४३ ए.डी २२६२ ) या मध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचे ६०० किलो गोमांस आढळून आले. तसेच झायलो कार (क्रमांक एम.एच ४४ ०८३४) हिच्यामध्ये ८० हजार रुपये किंमतीचे ४०० किलो गोमांस असे एकूण दोन लाख रुपये किंमतीचे १००० किलो गोमांसासह गोमांस भरलेला तीन लाख रुपये किंमतीचा पिवळसर रंगाचा छोटा हत्ती आणि तीन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची लाल रंगाची महिंद्रा झायलो असा आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

. या कारवाईचा सुगावा लागताच बुंदी उर्फ मुददसर करीम कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी त्याचा साथीदार सलमान नजीर शेख रा.नाईकवाडपुरा, संगमनेर याच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आले.
या प्रकरणी शहर पोलिसात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना सचिन दत्तात्रय आडबल यांनी फिर्याद दिल्यावरून राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना ही गोवंश जातीचे जिवंत जनावरे डांबून ठेवून त्यांना अमानुषपणे वागवून बिना चारा व पाण्याचे ताब्यात ठेवून त्यांची कत्तल करून गोंमासाची वाहतूक करताना मिळून आल्यावरून सलमान नजीर शेख  रा.नाईकवाडपुरा, संगमनेर आणि बुंदी उर्फ मुददसर करीम कुरेशी रा.भारत नगर, संगमनेर या दोघा विरुद्ध गुन्हा रजि. नंबर १०२९/ २०२२ भा.द.वि कलम २६९, ३४ महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चे कलम ५(क),९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे गोमांस  बाबत अनेक आंदोलने गुन्हे दाखल होत असताना  खुलेआम  गोमांस ची तस्करी  संगमनेरा होत  आहे याबाबत नागरिकांत   आश्चर्य व्यक्त होत आहे

गौतमी पाटील नेवाशा तालुक्यात येणार!



नेवासा- श्री खंडोबा देवस्थान यात्रा निमित्ताने महालक्ष्मीहिवरे गावचे यात्रा कमिटीचे वतीने  दि. 12/12/2023 ते 19/12/2023 रोजी पर्यंत  विविध  करमणूक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

1) दि. 14/12/2023 ते 18/12/2023 रोजी रात्री 8  वा ते 10. वा पर्यत देवाचा छबीना

2) दि. 15/12/2023 रोजी    रात्री  8 वाजता चैञाली पाटील यांचा आर्केस्ट्रा

3) दि. 16/12/2023 रोजी रात्री 8 वा  कोमल पाटोळे यांचा आर्केस्ट्रा

4) दि. 17/12/2023 रोजी रात्री 8 वाजता गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रा

5) दि. 18/12/2023 रोजी रात्री  सविता राणी पुणेकर यांचा तमाशा  महालक्ष्मीहिवरे ता. नेवासा येथे  दिनांक 14/12/2023 ते 18/12/203 रोजी पर्यत होणाऱ्या खंडोबा यात्रा  यात्रा उत्सवाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनी कलाकार संजय पाटील यांनी घेतली मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट

12/11/2025


संगमनेर ( प्रतिनिधी ) स्टार प्रवाह या दूरचित्रवाहिनी वरील अत्यंत लोकप्रिय असलेली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेता संजय पाटील व त्यांची पत्नी लेखिका अबोली गोखले यांनी आज मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट घेऊन चित्रपट मनोरंजन साहित्य या विविध विषयांवर चर्चा केली.

शिवाजीनगर सुदर्शन सिने अभिनेते व संगमनेरचे जावई संजय पाटील व त्यांची पत्नी अबोली गोखले यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, आनंद गोखले, गणेश गुंजाळ आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवाह वरील मालिका घराघरात पोचली असून अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. यामधील संजय पाटील यांची भूमिका ही मध्यवर्ती असून त्यांच्या पत्नी अबोली गोखले या लेखिका आहेत. नवीन नगर रोड येथील रहिवासी इंजिनीयर आनंद गोखले यांच्या त्या कन्या असून संजय पाटील हे संगमनेरचे जावई आहेत.


यावेळी त्यांनी चिरंजीव हे महारथी कर्ण यांच्या जीवनावर आधारित असलेले अबोली आनंद लिखित हे पुस्तक माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सतीश तांबे यांना भेट दिली याचबरोबर चित्रपट मालिका आणि साहित्य या विषयावर सविस्तर चर्चा केली.

यावेळी अभिनेते संजय पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जोपासला आहे. साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार, समाजकारण,कृषी, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. संगमनेर शहर व तालुका हा विकसित आणि वैभवशाली आहे. तो माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे. महाराष्ट्रात अनेक शहरे फिरण्याचा योग येतो. परंतु इतके भव्य दिव्य अद्यावत बस स्थानक, वैभवशाली इमारती,शांतता सुव्यवस्था असलेले शहर म्हणून संगमनेरचे पहिले नाव येते. अथक परिश्रमातून केलेले हे काम आहे. विकासाबरोबर साहित्य संस्कृतीला आणि कलाक्षेत्रालाही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या प्रती अनेक कलाकारांना मोठा आदर आहे. त्यांच्या समवेत भेट जीवनातील आनंदाचा ठेवा असल्याचे ते म्हणाले.


तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मराठी मालिका आणि चित्रपटांमधून अनेक निवेदित कलाकार अत्यंत दर्जेदार भूमिका करत आहेत. संदीप पाटील हे संगमनेरचे जावई असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महारथी कर्ण हा मोठा विषय आहे. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय कादंबरी नंतर कारणावरती अबोली गोखले या संगमनेरच्या कन्येने लिहिलेले चिरंजीव हे पुस्तक नक्कीच सर्वांसाठी वाचनीय ठरणारे आहे.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका घराघरात पोहोचली आहे आणि त्याचे सर्व श्रेय संदीप पाटील व त्यांच्या टीमला आहे. यावेळी संगमनेर मधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.